Advertisement

मतचोरी बंद करा! इंडिया आघाडीनं सुद्धा शड्डू ठोकला

प्रजापत्र | Monday, 11/08/2025
बातमी शेअर करा

दिल्ली :इंडिया आघाडीच्या ३०० खासदारांनी मकरद्वार ते निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यास सुरुवात केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी अडवला. खासदारांनी हातामध्ये 'सेव्ह व्होट'चे बॅनर घेतले आहेत. तथापि, दिल्ली पोलिसांनी सांगितले होते की इंडिया आघाडीने या मोर्चासाठी कोणतीही परवानगी घेतली नाही. बिहारमधील मतदार यादीतील अनियमिततेच्या आरोपावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ३०० विरोधी खासदारांनी दिल्लीत पायी मोर्चा काढला आहे. ते संसद भवन ते निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत जातील. दुसरीकडे, या खासदारांना बाहेर रोखण्याची तयारी आहे.

          संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज १६ वा दिवस आहे. लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच विरोधी खासदारांनी गोंधळ सुरू केला. खासदारांनी 'वुई वॉन्ट जस्टिस'च्या घोषणा देत सभागृहाच्या वेलमध्ये पोहोचले. यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी लोकसभा दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केली. काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, निवडणूक आयोगाला ही आमची मूलभूत विनंती आहे. विरोधी खासदारांनी केवळ शिष्टमंडळ नव्हे तर एकत्रितपणे निवेदन सादर करावे.
 

 

Advertisement

Advertisement