लातूर : लातूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने मोठी आघाडी घेतली आहे. सुरुवातीच्या कलात काँग्रेस व भाजपमध्ये चुरस दिसत होती. मात्र, आता काँग्रेस पक्षाने ३७ तर वंचित बहुजन आघाडीने सर्व पाच जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपसाठी हा धक्का असून काँग्रेस-वंचित आघाडीने बहुमताच्या दिशेने वाटचाल केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील असे वादग्रस्त विधान केले होते. याचा फटका भाजपला बसल्याचे दिसते आहे.
लातूर महापालिकेत शुक्रवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर भाजप आणि काँग्रेस पक्षामध्ये रस्सीखेच सुरू होती. त्यानंतर आता काँग्रेसने येथे मुसंडी मारली आहे. याठिकाणी १६ जागांवर काँग्रेसने आघाडी घेतली होती. तर भाजप व वंचित बहुजन आघाडी ३ जागांवर आघाडीवर घेतली असल्याचे चित्र होते.
दुपारनंतर मात्र याठिकाणचे चित्र बदलले असून काँग्रेस पक्षाने 37 तर वंचित बहुजन आघाडीने सर्व पाच जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपसाठी हा धक्का असून काँग्रेस-वंचित आघाडीने बहुमताच्या दिशेने वाटचाल केली आहे. या ठिकाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य भोवले असल्याची चर्चा रंगली आहे. लातूरकरांनी याठिकाणी काँग्रेस व वंचित आघाडीला भरभरून मतदान केल्याचे दिसते. या ठिकाणी काँग्रेस व वंचित आघाडीने बहुमताकडे वाटचाल सुरु ठेवली आहे.

