Advertisement

आयपीएलचे पुढचे सामने कुठे होणार हे ठरलं

प्रजापत्र | Saturday, 10/05/2025
बातमी शेअर करा

नवी दिल्ली : आयपीएल २०२५  ही स्पर्धा रद्द केली नव्हती तर ती स्थगित (ipl 2025)करण्यात आली होती. त्यामुळे आता आयपीएलचे पुढचे सामने येत्या काही दिवसांतच होणार आहेत. पण हे सामने कुठे होणार हे आता स्पष्ट करण्यात आले आहे. आयपीएलचे उर्वरीत सामने हे तीन शहरांमध्ये होणार असल्याचे आता समोर आले आहे.

           

भारताच्या सीमारेषेवर तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे आता पंजाब, धरमशाला येथे सामने होणार नाहीत, असे बीसीसीआयचे स्पष्ट केले आहे. कारण जी शहरं सीमारेषेजवळ आहेत, तिथे आता आयपीएलचे सामने होणार नाही. त्यामुळे आता बीसीसीआयने तीन अशी शहरं निवडली आहेत की जिथे चोख व्यवस्था मिळू शकते आणि कोणतीही समस्या जाणवणार नाही.बीसीसीआयने आता एक गोष्ट स्पष्ट केली आहे. जिथे कोणतीही समस्या जाणावणार नाही, तिथे आयपीएलचे सामने खेळवायचे. त्यासाठी आता बीसीसीआयने दक्षिण भारताची निवड केली आहे. कारण दक्षिण भारत हा सीमारेषेपासून लांब आहे आणि तिथे चोख सुरक्षा व्यवस्थाही मिळू शकते. त्यामुळे आता आयपीएलचे उर्वरीत सामने हे बंगळुरु, चेन्नई आणि हैदराबाद या तीन शहरांमध्ये खेळवण्याचा निर्णय आता बीसीसीआयने घेतल्याचे समोर आले आहे. आयपीएलचे सामने हे आता फक्त तीन शहरांत होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या वाढत्या लष्करी तणावामुळे भारतीय क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धा एका आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. 'बीसीसीआयने आयपीएल २०२५चा उर्वरित मोसम तातडीने आठवडाभरासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. परिस्थितीचा आढावा आणि सरकारशी चर्चा करूनच पुढील कार्यक्रम निश्चित केला जाईल', असे बीसीसीआयचे चिटणीस देवाजित सैकिया यांनी पत्रकाद्वारे कळविले होते. यामुळे शुक्रवारी रंगणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या सामन्यापासून पुढील स्पर्धा स्थगित झाली आहे. पण आता आयपीएलचे सामने कुठे होणार हे समोर येत आहे.

आयपीएलचे उर्वरीत सामने हे आता चेन्नई, बंगळुरु आणि हैदराबाद येथे खेळवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण हे सामने कधीपासून सुरु होतील, याची माहिती मात्र मिळू शकलेली नाही. त्याचबरोबर कोणत्या शहरात सामने खेळवले जातील, याबाबत बीसीसीआय लवकरच आपला निर्णय जाहीर करणार असल्याचे आता समजते आहे. त्यामुळे आता बीसीसीआय या गोष्टी नेमक्या कधी जाहीर करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे.

Advertisement

Advertisement